Monthly Archives: April 2015

स्‍फुलिंग-2, एप्रिल 2015

उद्धरण

धार्मिक दृष्टिकोनाणाच्या आधारे जगाच्या कोणत्याही भागात आंदोलन होऊ शकते. परंतु त्यामुळे कोणताही बहुमुखी विकास होईल असे वाटत नाही. आपणा सर्वांनाच जीवन प्रिय आहे आणि आपण सर्वजण जीवनाच्या रहस्यांचा भेद करण्यास उत्सुक आहोत. प्रचीन काळी विज्ञानाच्या मर्यादांमुळे ज्याला निसर्गाच्या नियमांचा नियंता मानण्यात आले अशा एका कल्पित इश्वराच्या चरणाशी दयेची भीक मागण्यावाचून आपल्यासमोर दुसरा कोणताही मार्ग नव्हता. प्राग्वैज्ञानिक युगातील मानवाला आपण असहाय्य असल्याचा अनुभव येत होता आणि कदाचित याच मानसिकतेतून धर्माचा उदय झाला. प्राचीन धर्मांमध्ये निसर्गासंबंधी विचारांची क्वचितच सुयोग्य व्याख्या दिसून येते. तसेच त्यांचे स्वरूप आत्मनिष्ठ आहे व म्हणूनच ते आधुनिक युगाच्या मागण्या पूर्ण करू शकत नाहीत.

प्रा. तुलसीराम यांना ‘स्‍फुलिंग’ची श्रद्धांजली

ते रशियन भाषा आणि इतिहासाचे उत्तम जाणकार,, एक चांगले वक्ता आणि शिक्षक असण्याबरोबरच एक दर्जेदार लेखकही होते. त्यांच्या आत्मकथेचे दोन खंड ‘मुर्दहिया’ आणि ‘मणिकर्णिका’ अनोख्या साहित्यकृती असण्याबरोबरच पूर्व उत्तर प्रदेशच्या दलितांच्या जीवनस्थितीचे तसेच साठ आणि सत्तरच्या दशकातील या क्षेत्रातील डाव्या आंदोलनातील घडामोडींचे जिवंत दस्तऐवज आहेत. त्यांच्या अनेक विचारांशी असहमती असूनदेखील जनतेशी असलेल्या त्यांच्या बांधीलकीचा तसेच निष्ठेचा आम्ही मनापासून आदर करतो. ‘स्‍फुलिंग’कडून त्यांना हार्दिक आणि विनम्र श्रद्धांजली.

जवखेड दलित हत्याकांडाने पुन्हा उघडकीस आणले व्यवस्थेचे वास्तव

देशातील दलित अत्याचारांचा इतिहास पाहता जे काही या प्रकरणात घडले त्यात आश्चर्य़ वाटण्यासारखे खरे तर काहीच नाही. पीडित कुटुंबातील व्यक्तींनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे, जातीय अत्याचारांच्या प्रकरणांना अनैतिक शरीर संबंधांतून झालेल्या खूनाचे रूप देणे हे गेल्या काही काळापासून वारंवार घडते आहे. या प्रकरणातही पुन्हा तेच पाहावयास मिळाले. त्यानंतर ‘दलित अत्याचार विरोधी कृती समिती’च्या सत्यशोधन समितीने पोलिस तपासाचा आढावा घेतला. सत्यशोधन समितीचा अहवाल पोलिस प्रशासनापासून मुख्यमंत्र्यापर्यंत अनेकांच्या या प्रकरणातील भूमिकेवर प्रश्न उपस्थित करणारा आहे. या अहवालाचा काही अंश आणि त्याने उपस्थित केलेले प्रश्न येथे देत आहोत.

ढंढारी बलात्कार आणि हत्या प्रकरण – सामाजिक वास्तावाचे दर्शन

आज समाजात स्त्रिया पावलोपावली महिलाविरोधी मानसिकतेच्या बळी ठरत आहेत. यामागे राजकीय वजन लाभलेल्या टोळक्यांकडून होणाऱ्या उपद्रवाचा मोठा वाटा आहे. अशा वेळी या समस्येला तोंड देण्यासाठी लोकांची एकजूट आत्यंतिक महत्त्वाची असून शहनाजला न्याय मिळवून देण्यासाठी लोकांनी उभारलेल्या संघर्षाने त्या एकजुटीचा एक आदर्श घालून दिलेला आहे. या संघर्षामुळे आरोपींना अटक झालीच, त्याचबरोबर स्त्रियांवर होणाऱ्या भीषण अत्याचारांना वाचा फोडत पोलिस आणि प्रशासनाच्या दडपशाहीला न जुमानता एकजुटीने संघर्ष करण्याची प्रेरणा दिलेली आहे. परंतु हा लढा अजून संपलेला नाही. शहनाजवर बलात्कार करून तिची हत्या करणाऱ्या नराधमांना शिक्षा होण्यासाठी लोकांची ही झुंजार एकता टिकवून ठेवावी लागेल, तसेच स्त्रिया व सर्वसमान्य जनतेला वेठीस धरणाऱ्या गुंडतंत्रापासून लोकांच्या संरक्षणाचा आणि मुक्तीचा हा लढा पुढे नेण्यासाठी लोकांची ही एकता अधिक विशाल आणि मजबूत बनवावी लागले.

किचाट – सुदेश जाधव यांची कथा

नऊ वाजल्यापासून लोकांची वर्दळ जास्तीच वाढली होती. कार्यकर्त्‍याना चांगलाच घाम फुटला होता. घामामुळे कपाळावरच्या टिक्क्यांचा वरघळ अगदी तोंडापर्यंत आला होता. बायांच्या मेणबत्त्या दुसऱ्यांदा संपल्या. त्या पेटवण्याचा तिसरा राउंड होता. गजरे सुकत चालले होते. तोंडावरची पावडर केव्हाच उडाली होती. मुख्यमंत्री साहेब आणि नटी केव्हाही येऊ शकतात या आदरापोटी बिचाऱ्या झक मारून प्रतिष्ठित नवऱ्यांच्या मानासाठी उभ्या होत्या. शमी एवढ्या गर्दीत असून नसल्यासारखीच उभी होती.

एका कामगाराच्या कविता

एक स्‍क्रू पडतो जमिनीवर
ओव्हरटाईमच्या या रात्रीत,
सरळ जमिनीच्या दिशेने, उजेड सांडीत
तो कोणाचेही लक्ष वेधून घेणार नाही,
अगदी मागच्या वेळेसारखा,
जेव्हा अशाच एका रात्री,
एक माणूस कोसळला होता जमिनीवर.

‘फॉक्सकॉन’च्या कामगारांचे नारकीय जीवन

चीनची फॉक्सकॉन कंपनी अ‍ॅप्पलसारख्या कंपन्यांसाठी महाग इलेक्ट्रॉनिक आणि संगणकाचे भाग बनवते. तिच्या कित्येक कारखान्यांमध्ये सुमारे १२ लाख कामगार काम करतात. या कारखान्यांमध्ये ज्या पद्धतीने कामगारांकडून काम करून घेतले जाते, त्यामुळे २०१० ते २०१४ पर्यंत आत्महत्येची २२ प्रकरणे समोर आली आहेत आणि अशा कित्येक घटना दाबून टाकण्यात आल्या आहेत.

‘गांधी’कार रिचर्ड अ‍ॅटनबरो यांना खुले पत्र

महात्मा गांधींचा सत्याग्रहाचा मार्ग आणि क्रांतिकारकांचा सशस्त्र क्रांतीचा मार्ग यांमधील संघर्ष हादेखील भारतीय समाजाच्या इतिहासाचा एक अविभाज्य भाग आहे. १९३१ साली भगतसिंह, राजगुरू आणि सुखदेव फाशी गेले त्यावेळी महात्मा गांधींच्या भूमिकेला देशभरात मोठ्या प्रमाणात विरोध होत होता आणि या क्रांतिकारकांचे हौतात्म्य काही साधीसुधी घटना नाही, तर तिच्या राजकीय संदर्भांमुळे ती नितांत महत्त्वाची ऐतिहासिक घटना आहे. असे असूनही भगतसिंहांसारख्या क्रांतिकारकाचा व त्यांच्या हौतात्म्याचा आपल्या चित्रपटात नामोल्लेखदेखील नाही, याला काय म्हणावे?

सांप्रदायिक फासीवाद्यांचे जनतेत फूट पाडण्याचे प्रयत्न हाणून पाडा

महान क्रांतिकारी शहिदे आजम भगतसिंह यांनी म्हटले होते की सामान्य गरीब कष्टकरी जनतेचा एकच धर्म असतो – वर्गीय एकजूट! आपल्याला सर्व प्रकारच्या धार्मिक कट्टरपंथियांना नाकारावे लागेल आणि त्यांच्या विरोधात लढावे लागेल. आपल्याला शपथ घ्यावी लागेल की आपण आपल्या गल्लीबोळात, मोहल्ल्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या धार्मिक कट्टरपंथियांना सांप्रदायिक उन्माद भडकवू देणार नाही आणि त्यांना पिटाळून लावू! आपल्याला मागणी करावी लागेल की केंद्र सरकार आणि सर्व राज्य सरकारांनी धर्माला राजकारण आणि सामाजिक जीवनापासून वेगळे करण्यासाठी कडक कायदा बनवावा. धर्म भारतीयांची खाजगी बाब असली पाहिजे व कोणत्याही पक्ष, दल, संघटना किंवा नेत्याला धर्म किंवा धार्मिक संप्रदायाच्या नावाखाली राजकारण केल्यास, वक्तव्ये केल्यास व उन्माद भडकविण्याचा प्रयत्न केल्यास कडक शिक्षा दिली गेली पाहिजे व त्यांच्यावर प्रतिबंध घालण्यात आला पाहिजे.

« Older Entries