Category Archives: Uncategorized

सण-उत्सवांसंबंधी काही विचार

-कात्यायनी (अनुवाद: जयवर्धन) शेतीवर अवलंबित प्राचीन समाजात सणांचा जन्म पिकांच्या पेरणी आणि कापणीच्या हंगामावर आधारित होता. सार्वजनिक आनंद उत्सवाचे ते संस्थात्मक स्वरूप होते. कल्पनावादी (जादूई) विश्व दृष्टिकोन आणि नैसर्गिक शक्तींची पूजा करण्याच्या आदिम काळात या सणांसोबत जादूटोण्याच्या काही सामूहिक क्रिया जोडलेल्या होत्या. मग संस्थाबद्ध धर्मांनी या सणांना सत्ताधारी वर्गाच्या हितानुसार पुनर्संस्कारित व पुनर्गठित केले आणि त्यात विविध धार्मिक पौराणिक कथा आणि विधी जोडले गेले. असे असूनही, भांडवलशाहीपूर्व समाजात, सामान्य उत्पादक जनसमुदायाने हे सण-उत्सव मोठ्या प्रमाणात त्यांच्या पद्धतीने साजरे केले. सण

प्रेम आणि मुक्तीचे गीतकार: जनकवी फैज

(फैज अहमद फैज यांच्या 13 फेब्रुवारी या जन्मदिनानिमित्त ) लेखक: अमन “क़त्ल-गाहों से चुन कर हमारे अलम और निकलेंगे उश्शाक़ के क़ाफ़िले..” [न्याय आणि समतेच्या या संग्रामात कत्तलखान्यांतून आमची कत्तल जरी करण्यात आली तरी आमच्या खाली पडलेल्या ध्वजा उचलण्यासाठी अजून कित्येक प्रेमी त्यांचे लष्कर घेऊन येतील.] उर्दू कवितेच्या इतिहासात जे स्थान फैज अहमद फैजना जनतेने आपल्या हृदयांत दिले ते कदाचितच इतर कोणाला मिळाले असेल. “हम देखेंगे” हे गीत तर सांप्रदायिक नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात जनतेचे युद्धगीतच बनले होते. 13 फेब्रुवारी

कोरोना षडयंत्र सिद्धांत: वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या अभावाचे परिणाम

लेखक: निखिल आज कॉविड -19 महामारीचा उद्रेक होऊन 2 वर्षापेक्षा जास्त काळ लोटलेला आहे. दरम्यानच्या काळात जग अतोनात जीवित तसेच वित्तीय हानीतून गेले आहे आणि साहजिकच भांडवली समाजातील इतर बहुतांशी सामाजिक संकटांप्रमाणे ह्या आरोग्य संकटाचा सर्वाधिक मार जगभरातील कामकरी जनतेवरच पडला. ध्वस्त झालेली एकंदरीत आरोग्य व्यवस्था, खाजगी दवाखान्यांची लूट, ऑक्सिजन पासून औषधींचा काळाबाजार सोबतच केंद्र व राज्यसरकारांच्या अनियोजित लोकडाऊनमुळे उपासमार, बेकारी व अनेक प्रवासी कामगारांची हजारो किलोमीटरची पायी फरफट अशा किती समस्या सांगाव्यात? ह्या आरोग्य संकटाच्या काळात भांडवली आर्थिक व्यवस्थेचा

‘द काश्मीर फाइल्स’: काश्मिरी पंडितांची शोकांतिका दाखवण्याच्या नावाखाली मुस्लिम आणि डाव्यांविरुद्ध द्वेष वाढवण्याचा हिंदुत्ववाद्यांचा डाव

मूळ हिंदी लेखाचे लेखक:आनंद सिंहअनुवाद:जय उत्तर प्रदेशसह चार राज्यांतील विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विजयानंतर संघ परिवाराची संपूर्ण फॅसिस्ट यंत्रणा आता विवेक अग्निहोत्रीच्या ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पंतप्रधान मोदींनी चित्रपटाच्या निर्माता, दिग्दर्शक आणि मुख्य कलाकारांची भेट घेतली. एवढेच नाही तर हा चित्रपट चर्चेत रहावा म्हणून मोदींनी भाजपच्या बैठकीत या चित्रपटाला बदनाम करण्याच्या षडयंत्राचा उल्लेख केला. गृहमंत्री अमित शहा यांनीही चित्रपटाच्या टीमची भेट घेतली. जास्तीत जास्त लोकांना चित्रपट पाहता यावा म्हणून भाजपशासित राज्यांनी चित्रपट

विज्ञानाकरिता प्राणांचे दान देणारा शहीद वैज्ञानिक ब्रुनो

आजपासून ठीक 422 वर्षांआधी 17 फेब्रुवारीला सन 1600 मध्ये आपल्या तत्त्वांसाठी बलिदान देणाऱ्या महान वैज्ञानिक जर्दानो ब्रूनो ला रोम मध्ये मृत्युदंड दिला गेला होता. मृत्युदंड देण्याचा ‘न्यायालयाचा’ निर्णय ऐकून ब्रूनो ने ‘इन्क्विझिटर’ना (inquisitor) शांतपणे सांगितले होते “तुम्ही दंड देणार आहात आणि मी आपला गुन्हेगार आहे, परंतु आश्चर्याची गोष्ट ही आहे की दयाळू देवाच्या नावावर आपला निर्णय देतांना सुद्धा तुमचे हृदय माझ्यापेक्षा अधिक भयग्रस्त आहे.” ‘इन्क्विझिशन’ ची ही प्रथा होती की ते आपला निर्णय या धूर्ततापूर्ण शब्दांमध्ये द्यायचे – “पवित्र धर्म

कृषी कायद्यातील वादात औद्योगिक-वित्तीय मोठ्या भांडवलदारांविरुद्ध पहिल्या फेरीत कृषी भांडवलदारांनी मिळवला विजय: कामगार वर्गासाठी अन्वयार्थ

लेखक: अभिनवअनुवाद: अभिजित मूळ इंग्रजी पोस्ट: https://www.facebook.com/abhinav.disha/posts/4649869885097447 श्रीमंत कुलक आणि शेतकरी, म्हणजे पंजाब, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशच्या कृषी भांडवलदारांनी, भारतातील मोठ्या औद्योगिक-वित्तीय भांडवलदारांवर, किमान आत्तापर्यंतच्या लढाईच्या पहिल्या फेरीत तरी, विजय मिळवला आहे. मोदी सरकारच्या या पावलामागे कोणती कारणे आहेत? बघूयात. काल, मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी प्रसारमाध्यमांद्वारे मोदी सरकारला कळवले होते की यूपीमधील आगामी विधानसभा निवडणुकीत पश्चिम यूपीमध्ये भाजपचा मोठा पराभव होणार आहे. आरएसएसच्या तळागाळातील यंत्रणांकडून भाजप नेतृत्वाला तशाच प्रकारचे अहवाल प्राप्त झाले आहेत. रोजगार, अन्नसुरक्षा आणि गरिबी या

वाढत्या साम्राज्यवादी संघर्षाची अजून एक रणभूमी: युक्रेन

अभिजित रशिया आणि अमेरिकेच्या साम्राज्यवादी गटांमध्ये पुन्हा एकदा संघर्ष तीव्र झाला आहे आणि यावेळी तो युक्रेनच्या धरतीवर युद्धाचे स्वरूप घेण्याकडे जात आहे. लेनिनने केलेली साम्राज्यवादाची मांडणी आजही लागू होते, आणि भांडवली प्रतिस्पर्धा साम्राज्यवादी संघर्षांना व युद्धांना जन्म देतेच हे या घडामोडीने पुन्हा सिद्ध केले आहे . आता अमेरिकेच्या नेतृत्वातील एकध्रुवीय (युनीपोलर) जग निर्माण झाले आहे म्हणणाऱ्या किंवा जागतिक भांडवलशाही आता शांततेच्या कालखंडात प्रवेश करती झाली आहे असे म्हणणाऱ्यांना सुद्धा या घटनांनी पुन्हा एकदा खोटे ठरवले आहे. भारतातील आणि जगातील भांडवली

मुंबई मध्ये विषारी दारु पिण्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या 87 लोकांच्या मृत्युस जबाबदार कोण?

झोपड़पट्टयांमध्ये पोलिसांच्या गाड्या दिवस रात्र चक्कर मारत असतात. हे पोलिसवाले ह्या भागात चकरा तिथे कायदा व्यवस्था कायम करण्यासाठी मारत नसतात तर स्थानिक छोटे व्यापारी आणि कारखानदार यांच्या साठी भाडोत्री गुंडांसारखे काम करतात. सर्व अपराध, सर्व बेकायदेशीर कामे पोलिसांसमक्ष होत असतात आणि हे सर्व धंदे पोलिस, नगरसेवक-आमदार-खासदार आदींचे खीसे गरम करूनच केले जातात. निशंकपणे आपण म्हणू शकतो अशा अवैध्य दारु भट्टयांबद्दल प्रशासनाला पूर्ण कल्पना असते. दारु अधिक परिणामकारक करण्यासाठी त्यात मेथानोल आणि कित्येक वेळा पेस्टीसाइडसुद्धा उपयोगात आणले जातात. अशा दारुच्या गुणवत्तेचे काही निश्चित मानकं नसतात आणि तिची लॅबोरेटरी चाचणी सुद्धा होत नाही, त्यामुळे अशा दारुमध्ये ह्या धोकादायक पदार्थांची मात्रा कमी जास्त होत रहाते. ह्या दारुमध्ये ह्या विषारी पदार्थांची मात्रा कमी असली तरी अशा दारुच्या निरंतर सेवानामुळे डोळे ख़राब होण्यासारखे धोके तर कायम असतातच. ह्या विषारी पदार्थांचे प्रमाण जर जास्त असेल तर काय होते, हे ह्या घटनेच्या निमित्ताने समोर आलेच आहे.

प्रा. तुलसीराम यांना ‘स्‍फुलिंग’ची श्रद्धांजली

ते रशियन भाषा आणि इतिहासाचे उत्तम जाणकार,, एक चांगले वक्ता आणि शिक्षक असण्याबरोबरच एक दर्जेदार लेखकही होते. त्यांच्या आत्मकथेचे दोन खंड ‘मुर्दहिया’ आणि ‘मणिकर्णिका’ अनोख्या साहित्यकृती असण्याबरोबरच पूर्व उत्तर प्रदेशच्या दलितांच्या जीवनस्थितीचे तसेच साठ आणि सत्तरच्या दशकातील या क्षेत्रातील डाव्या आंदोलनातील घडामोडींचे जिवंत दस्तऐवज आहेत. त्यांच्या अनेक विचारांशी असहमती असूनदेखील जनतेशी असलेल्या त्यांच्या बांधीलकीचा तसेच निष्ठेचा आम्ही मनापासून आदर करतो. ‘स्‍फुलिंग’कडून त्यांना हार्दिक आणि विनम्र श्रद्धांजली.

‘फॉक्सकॉन’च्या कामगारांचे नारकीय जीवन

चीनची फॉक्सकॉन कंपनी अ‍ॅप्पलसारख्या कंपन्यांसाठी महाग इलेक्ट्रॉनिक आणि संगणकाचे भाग बनवते. तिच्या कित्येक कारखान्यांमध्ये सुमारे १२ लाख कामगार काम करतात. या कारखान्यांमध्ये ज्या पद्धतीने कामगारांकडून काम करून घेतले जाते, त्यामुळे २०१० ते २०१४ पर्यंत आत्महत्येची २२ प्रकरणे समोर आली आहेत आणि अशा कित्येक घटना दाबून टाकण्यात आल्या आहेत.

« Older Entries