उद्धरण

धार्मिक दृष्टिकोनाणाच्या आधारे जगाच्या कोणत्याही भागात आंदोलन होऊ शकते. परंतु त्यामुळे कोणताही बहुमुखी विकास होईल असे वाटत नाही. आपणा सर्वांनाच जीवन प्रिय आहे आणि आपण सर्वजण जीवनाच्या रहस्यांचा भेद करण्यास उत्सुक आहोत. प्रचीन काळी विज्ञानाच्या मर्यादांमुळे ज्याला निसर्गाच्या नियमांचा नियंता मानण्यात आले अशा एका कल्पित इश्वराच्या चरणाशी दयेची भीक मागण्यावाचून आपल्यासमोर दुसरा कोणताही मार्ग नव्हता. प्राग्वैज्ञानिक युगातील मानवाला आपण असहाय्य असल्याचा अनुभव येत होता आणि कदाचित याच मानसिकतेतून धर्माचा उदय झाला. प्राचीन धर्मांमध्ये निसर्गासंबंधी विचारांची क्वचितच सुयोग्य व्याख्या दिसून येते. तसेच त्यांचे स्वरूप आत्मनिष्ठ आहे व म्हणूनच ते आधुनिक युगाच्या मागण्या पूर्ण करू शकत नाहीत.