ऐरण प्रकाशनाकडून तरुणांसाठी काही महत्वाची पुस्तके

शहिद भगतसिंग यांच्या पाच आणि सोबतच पाच इतर महत्वपूर्ण पुस्तिका
देशातील महान क्रांतिकारक विचारांना जाणून घ्या आणि इतरांना सुद्धा जाणून घेण्यात मदत करा
शहिद भगतसिंग यांच्या पाच आणि सोबतच पाच इतर महत्वपूर्ण पुस्तिका
देशातील महान क्रांतिकारक विचारांना जाणून घ्या आणि इतरांना सुद्धा जाणून घेण्यात मदत करा
सत्याचा प्रकाश त्या लोकांना त्रासदायक आहे,ज्यांना अंधार सवयीचा झालाय. त्यांना ज्ञानाचा प्रकाश दाखवणे म्हणजे वटवाघुळांच्या घरट्यात सुर्याचा एक किरण सोडणे, ज्याने त्यांच्या डोळ्यांना त्रास होतो व ते चीं-चीं करू लागतात.
साधू, संत, पाद्री, मौलवी यांचा वापर नेहमीच शोषक वर्ग करीत आलेला आहे. यांच्या बदल्यात भांडवलदारी लुटीचा एक हिस्सा या धार्मिक गटाला मिळत आहे. जसजशी सामाजिक-आर्थिक-राजकीय परिस्थिती बदलते तसा धर्मातही बदल होत जातो. आज भांडवलदारी व्यवस्था कायम झाल्यासारखी दिसतेय आणि त्यामुळे धर्माचे रूपांतरही बाजारी व्यवस्थेत झालेले आहे. स्वतःला “देवदूत” किंवा “परमेश्वराचे रूप” मानणारे हे बाबा, संत हे स्वतःच भांडवलदार झालेले आहेत. ते खरे म्हणजे दलाल, भांडवलदार प्रथम आहेत आणि साधूसंत नंतर आहेत.
काय आहे इस्त्रायल-पॅलेस्ताईनचा प्रश्न आणि जगाच्या राजकारणात तो इतका महत्वाचा का आहे? जगभरातील भांडवलदारांच्या ताब्यातील मुख्य प्रसारमाध्यमे सतत इस्त्रायलच्या बाजूने लिहिण्याचा किंवा पॅलेस्तिनी बाजू लपवण्याचा प्रयत्न करत असतात. खरेतर जगातील सर्वाधिक हिंमती आणि चिवट असा स्वातंत्र्यलढा पॅलेस्ताईनमधील लोक गेली सात दशके लढत आहेत.
राजकारणामध्ये गोष्टी एखाद्या पक्षाच्या नेत्याचा साधेपणा किंवा भ्रष्टाचार मुक्त जीवनातून नाहीत तर व्यक्ती व पक्षाच्या विचारधारेवरून, राजकारण आणि धोरणांवरून ठरत असतात. गांधी आणि नेहरूंच्या काळातील बहुतेक काँग्रेसी नेते सुद्धा साधं जीवन जगत होते. आणीबाणीचे समर्थन करणारे भाकप नेते इंद्रजीत गुप्तासुद्धा अतिशय साधे जीवन जगत होते. आणखी मागे गेल्यास दिसेल की प्रुधो, बाकुनिन आणि व्हाईटलिंग सुद्धा अत्यंत गरिबीत आयुष्य जगायचे आणि मार्तोव, मार्तिनोव सारखे तमाम मेन्शेव्हिक नेतेसुद्धा भ्रष्टाचारी किंवा श्रीमंतांमध्ये जगणारे लोक नव्हते. हे त्यांच्या राजकारणावरून ठरायचे की ते क्रांतिकारी होते की कामगार वर्गाचे शत्रू. जर राजकारण नेत्यांच्या जगण्याचा पद्धतीवरूनच ठरत असतं तर तमाम राजनीतिशास्त्र आणि राजकीय अर्थशास्त्र समजून घेण्याची गरजच काय होती! भावुकतावादी मार्क्सवादी, मार्क्सवाद तर काही अभ्यासत नाहीत, ‘कॉमन सेन्स लॉजिक’ वापरत राहतात. ते स्वतःला मार्क्सवादी म्हणवतात परंतु ते तॉलस्तॉयपंथी असतात.
आपल्या देशात महिलांविरोधी वक्तव्य देण्यात यांसारखे घोर महिलाविरोधी मानसिकतेची नेते पुढाकार घेतात. त्यामध्ये भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते आघाडीवर असतात. यापैकी तर काही महिलांवर वाढत आणि होत असलेल्या अत्याचारांसाठी महिलांनाच जबाबदार धरतात. त्यासाठी हे टुकार नेते महिलांनाच सल्ले देत फिरतात की त्यांनी छोटे कपडे घालू नयेत, मुलींनी जीन्स वापरू नयेत, मोबाईल फोन वापरू नयेत, इत्यादी. याचं महत्वाचं कारण म्हणजे आपला समाजच पुरुषसत्ताक मानसिकतेचा समाज आहे. एकीकडे “बेटी बचाव बेटी पढाव” च्या घोषणा द्यायच्या आणि दुसरीकडे घोर महिलाविरोधी वक्तव्य करायची. याचे दुसरे कारण म्हणजे यांची विचारधाराच महिलाविरोधी आहे.
गांधी एका तत्वज्ञाच्या रुपात अपंग ”भारतीय” बुर्जुआ मानवतावादाचे मूर्त रूप होते. ते बुर्झ्वा वर्गाचे सिद्धांतकार आणि नीती निर्माते होते आणि त्यापेक्षाही, ते बुर्झ्वा वर्गाच्या ‘मास्टर स्ट्रॅटेजिस्ट’ आणि ‘मास्टर टॅक्टीशियन’च्या रुपात वेळोवेळी आपल्या उद्देशांच्या पूर्तीसाठी स्वतःच्या सैद्धांतिक निष्ठा बाजूला सारणारे एक अत्यंत निष्ठुर व्यवहारवादी (Pragmatist) व्यक्ती होते.
इंटरनेट, सोशल मीडिया आणि व्हाट्सअपच्या माध्यमातून समाजामध्ये खोट्या बातम्या पसरविण्याच्या घटना, ज्यांना फेक न्यूजच्या नावाने ओळखले जाते, जगभरात भयावह रुप धारण करत आहे. अमेरिकेमध्ये मागील राष्ट्रपती निवडणूकीत ट्रंपच्या कार्यकर्त्यांनी या फेक न्यूजचा मोठ्या प्रमाणात वापर करत अप्रवासी, मुस्लिम व लॅटीन लोक आणि काळ्या लोकांच्या विरोधात घृणास्पद वातावरण बनविले, ज्याचा ट्रंपच्या विजयात सिंहाचा वाटा होता. याचप्रकारे युरोप खंडातील भरपुर देशांमध्ये सुध्दा अप्रवासियांच्या विरोधात घृणा पसरविण्यामध्ये फेक न्यूजचा चांगलाच वापर सुरु आहे. ब्रिटनमध्ये युरोपीय संघातून वेगळं होण्यासाठी झालेल्या जनमत चाचणी दरम्यान सुध्दा फेक न्यूजचा खुल्या प्रकारे वापर केला गेला. परंतु भारतात फेक न्यूजच्या घटना ज्याप्रकारे पसरत आहे तशी परिस्थिती क्वचितच अन्य कुठल्या देशात बघावयास मिळेल. याचे मुख्य कारण हे आहे की, भारतामध्ये अधिकांश फेक न्यूज संघासारख्या केडर आधारित फॅसिस्ट संघटनांद्वारे संघटित मार्गाने पसरविल्या जात आहेत, ज्यांचा संपर्क देशातील कानाकोपऱ्यापर्यंत आहे.
जनतेच्याच पैशातून सरकार जनतेला शिक्षण-रोजगार-आरोग्या सारख्या मुलभूत सुविधा देऊ शकत नाही तर मग सरकार आहेच कशाला? भांडवलदारांना तर कोट्यवधी-अब्जावधी रुपये आणि सुविधांचे दान दिले जाते, त्यांची कोटी-कोटींची कर्ज माफ केली जातात; त्यांना लाखो-कोटी रुपयांची कर माफी दरवर्षी दिली जाते; बॅंकांमध्ये असलेले लाखो-कोटी रुपये धनदांडगे विनाढेकर पचवतात आणि दुसरीकडे सामान्य गरीब लोक व्यवस्थेचे शिकार होऊन बरबाद होत आहेत. जनतेच्या जीवनात खऱ्या अर्थाने बदल घडवू शकणारा रोजगाराचा अधिकारच राज्यघटनेत मुलभूत अधिकार म्हणून नाही! हा अधिकार मुलभूत अधिकार व्हावा ही मागणी आम्ही करत आहोत.
मी माझं म्हणणं पुन्हा एकदा मांडतो की गरीबांसाठी धर्म अत्यंत गरजेचा आहे. मला हे आवडतं. तो म्हणतो कि या पृथ्वीवरील सर्व वस्तू सैतानाच्या आहेत आणि हे मानवा जर तू आपल्या आत्म्याला वाचवू पाहतोस तर पृथ्वीवरील कोणत्याच वस्तूला स्पर्श करायची देखील लालसा बाळगू नकोस. जीवनातील सर्व सुखे तुला मरणानंतर भेटतील. स्वर्गातील प्रत्येक वस्तू तुझीच आहे. जेव्हा लोक या गोष्टीवर विश्वास ठेवतात, तेव्हा त्यांना काबूत ठेवणं सोपं जाते. हो. धर्म एका चिकट वंगणासारखं काम करतो आणि जीवनाच्या यंत्राला आपण हे वंगण सतत घालत राहिलो तर सारे भाग व्यवस्थित काम करत राहतात आणि यंत्र चालविणाऱ्यासाठी सोपं होतं.